पावसामुळे टँकरची मागणी घटली   

पुणे : मागील काही दिवसांपासून शहर व परिसरामध्ये पडणार्‍या पावसामुळे उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई सामना करावा लागलेल्या पुणेकरांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. यामुळे पाण्याची मागणी आणि त्यासंबंधीच्या तक्रारींमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
 
शहरात एप्रिल महिन्यातच तापमानाचा पारा ४३ अंशांवर गेला होता. त्यामुळे पाण्याची मागणील वाढली होती. मे महिन्यात उन्हाळा आणखी कडक होईल पाण्याची मागणी आणखी वाढेल अशी भिती होती. मात्र, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तापमान ३४ पर्यंत खाली आले. त्यानंतर दुसर्‍या आठवड्यात ८ मे पासूनच शहर व परिसरात अवकाळी पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर आता १९ मे पासून जवळपास दररोज पूर्वमोसमी पाऊस हजेरी लावत आहे. परिणामी अनेक ठिकाळी तळ गाठलेल्या बोअरवेलला पुन्हा पाणी सुरू झाले आहेत. उकाडा कमी झाल्याने पाण्याच्या मागणीतही घट झाली आहे. शिवाय पाणी पुरवठ्याच्या तक्रारीही कमी झाल्या आहे. दोन महिन्यांत शहरात पाण्याची मागणी २५ टक्क्यांपर्यंत वाढली होती. आता ती जवळपास १५ टक्के कमी झाल्याची माहिती पाणीपुरवठा अधिकार्‍यांनी दिली आहे.
 
मागणीत १० टक्यांनी घट
 
उन्हाळ्यामुळे खासगी टँकरची मागणी वाढली होती. महापालिकेकडून हे पाणी घेऊन खासगी टँकरधारकांकडून उपनगरांमधील सोसायट्यांना दिले जात होते. मात्र, पावसामुळे ही मागणीही कमी झाली असून, या मागणीतही १० टक्के घट आली आहे.

Related Articles